पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनरंग...

इमेज
✍️ त्याने निसर्ग कविता हिरव्या रंगानं लिहिल्या .. प्रेम कविता गुलाबी .. दुःखद अनुभव काव्य लाल, करड्या अन् सरड्या रंगानं  आता मात्र तो साऱ्या कविता फक्त निळ्या रंगानं लिहितो .... कारण  नदी खाली असते सागरास मिळते .... आकाश वर असते सर्वांना सामावून घेते ... ते निळा रंग धारण करतात. प्रवाही राहणं हेच जीवन हे आता त्याला उमजलंय.

ऋतसंहार

इमेज
  वरील काव्य श्री देशमाने काका यांचे मित्र प्रसिद्ध कवी श्रीयुत सदानंद डबीर यांनी रचलं आहे..  काव्य उत्तमच आहे . हे काव्य वाचून आणि चित्र बघून मला काव्य सुचले.... ऋतसंहार ११ .१०.२०२३.    तुझं नयन दल,   गालावरील खळी,  शुभ्र दंतपंक्ती,  चाफेकळी नाक लाल ओष्टकमल  आणि  मोहक केशसंभार हाच सारा ऋतुसंहार   जेंव्हा असतीस तु जवळपास  पाहून तुझी रम्य अदा ऋतू बहरतात सत्वर सदा खास कवित्व ऋतूसाठी नच अडे   नसे आमुचें प्रेम नुसते बोलघेवडे https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/6/mahakavi-kalidas.html या लेखातून उधृत.... ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्यही कालिदासाची प्रथम रचना. ‘संहार’ या शब्दाचा अर्थ येथे विध्वंस करणे किंवा नाश करणे, असा नसून संचय करणे, एकत्रित करणे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. कालिदासाने लिहिलेले ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्य म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगणार्‍या ऋतुवर्णनाचा संग्रह होय. या काव्यात सहा सर्ग आहेत. त्यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रत्येक सर्गात १६ ते २८ श्लोक असे त्याचे सुयोग्य विभाजन. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसील...

रम्य ते बालपण.....

इमेज
आज बालदिन आई लहानपणी पेरू, लहान आंबट गोड बोरं, काशी बोरं कवठ फळ , आंब्याच्या दिवसात रायवळ आंबे, भुईमूग शेंगा ऋतुनुसार अशी फळे आपणा सर्वांना खायला देत असे. ही फळे देताना विशेषतः जी फळे मर्यादित असत त्यांच्या बाबतीत वाटा करून दिला जाई आणि त्यामध्ये मग भावंडांमध्ये थोडीफार कुरबुर होत असे त्यात एक वेगळीच मजा असे. विशेषतः कवठ आणि गुळ एकत्र असा खाऊ याचा वाटा आपल्याला आहे तो खाऊन झाल्यावर भावंडांच्या वाट्यात लक्ष घालून मला थोडेसे दे अशी लाडीगोडी लावली जात असे आणि मग भाऊही थोडासा त्यातला आपल्याला देत असे. अशा या लहानपणीच्या गमती जमती काही मधुर तर काही आंबट गोड बाळ जीभ जागवणाऱ्या आणि स्मृती पटलावर उमटलेल्या. त्याची आठवण प्रकर्षाने झाली आणि मग एक काव्य उमलले ते असे. 🎶🎶 बाल दिनानिमित्त बालपणात घेऊन जाणारी आत्ताच सुचलेली कविता..  *रम्य ते बालपण*  कधीच संपू नये असे..  स्मृती त्या आईने विळीवर चिरून दिलेल्या  पेरूच्या, कवठ गुळाच्या, राय अवळे,गावठी आवळे, आंबट गोड बोरं,  काशीबोरे , कैरी चिंच मिटक्या मारत खायच्या , चोखून खायच्या रायवळ आंब्याच्या....  पापड लाट्या गट्टम् क...