गाई घरा आल्या ...रसग्रहण
गाई घरा आल्या घणघण घंटानाद कुणीकडे घालूं साद गोविंदा रे ? ‘ गाई घरा आल्या ’ ही कवी वा गो मायदेव यांची एक अर्थवाही करूण भाव व्यक्त करणारी कविता आहे. शेतीवाडी , घरदार गाई गोठा ही खेडेगावातील समृद्धी .गाई म्हशी हे दूधदुभतं देणार पशुधन. अशाच एका समृद्ध घरात संध्याकाळ झालेली आहे. गाईगुरांच्या परतीची वेळ झाली आहे. घर मालकीण माऊली त्यांची वाट पाहत आहे.गुराख्याच्या संगीतीने चरावयास गेलेल्या सर्व गाई हळूहळू परत येत आहेत , गाईच्या गळ्यातील घंटेचा नाद अंगणात , गोठ्यात घुमत आहे. आता सर्व गायी परतल्या , मात्र गोविंदा(गुराखी )परत आलेला नाही. त्याची वाट पाहत ती आता काळजीग्रस्त झाली आहे. त्या माऊलीच्या जिवाची घालमेल सुरु आहे -का आला नाही गोविंदा? केव्हा येईल ?या विचारात ती पडली आहे. या परिस्थितीचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्या माऊलीची जितकी माया गाई गुरांवर आहे तितकीच माया त्या गुराख्यावरही आहे. हा कान्हा गुराखीच त्या गुरांना सांभाळत आहे .त्या गुरांना त्या मुक्या जनावरांना त्याने माया लावलेली आहे .त्याच्या बासरीतील मंजुळ ध्वनीच्या लयीत ती निवांत चरत असतात आणि तो आहे साथील