पाऊले चालती पंढरीची वाट...दोन अनुभव
दोन वर्षाच्या अवकाशानंतर पंढरीची वाट आता पुन्हा वैष्णवांच्या पाऊलांनी सजलेली आहे. नुकतेच देहूतून श्री तुकोबारायांच्या आणि आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झालं आहे. एक भक्तीगंगा प्रवाह लोणंद मार्गे तर दुसरा सासवड मार्गे पंढरीच्या कळसदर्शनासाठी मार्गस्थ झाला आहे . महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या संतांच्या नावाचा दिंड्या पंढरपुरी जाण्यास निघालेल्या आहेत. सारा आसमंत विठुरायाच्या गजराने भरून गेला आहे. सारं महाराष्ट्र मानस विठ्ठलमय झालं आहे. वर्षानुवर्षे हा पालखी सोहळा सुरू आहे. अशा प्रकारचा सर्व समाज घटक समावेशक सोहळा अभावानेच इतरत्र देशी घडत असेल. भाव भोळी वारकरी मंडळी जात धर्म वंश वर्ण लिंग भेद विसरून ' राम कृष्ण हरि पांडुरंग हरि अवघी दुमदुमली पंढरी ' असा नामघोष करीत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वाटचाल करू लागली आहेत. जेथून पालखी जात आहे आणि जिथे जिथे म्हणून पालखी मुक्काम घडत आहे तेथील ग्रामस्थ मंडळी अतिशय आनंदाने त्यांचं सडा रांगोळ्या घालून स्वागत करत आहेत. खाऊ पिऊ घालत आहेत , औषध पाणी विचारत आहेत काही इतर अडचणी असल्यास त्यातही मदतीचा हात देत आहेत. सारे ग्र