पोस्ट्स

लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वरमयी प्रभा-

इमेज
  // श्री सरस्वती माता प्रसन्न // स्वरमयी प्रभा- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे  यांना २६ जानेवारी २०२२ च्या पूर्वसंध्येस "पद्मविभूषण " पुरस्कार जाहीर झाला. एक महान गायिका, अतिशय समर्थ शिक्षिका, संगीताच्या अभ्यासक, लेखिका व कवयित्रीही असं दिव्य प्रतिभेचं लेणं ल्यायलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विदुषी स्वरयोगिनी प्रभा अत्रे . सामान्य माणूस ज्याला शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही तो ही त्यांच्या मारुबिहाग ,कलावती व मिश्र खमाज मधील कौन गली मोरा श्याम ही ठुमरी असलेल्या प्रसिद्ध  ध्वनिमुद्रिकेतील स्वर  कानावर पडताच अंतर्मुख होतो . या ध्वनिमुद्रिकेस अमाप लोकप्रियता लाभली  आणि आजही जवळजवळ पन्नास वर्षे ती तशीच टिकून आहे.जेव्हा जेव्हा रागांवर आधारित गाण्यांचा विषय निघतो त्यावेळी कलावती आणि मारुबिहाग हे नाव निघताच डॉक्टर प्रभा  अत्रे हे नाव ओठावर लगेच येते. 'प्रथम तुझं पाहता' हे मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत अथवा' दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी' अशी गाणी ऐकली की ती कलावती या रागावर आधारित गाणी आहेत असं  शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहीत नसणाऱ्य...

स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत

इमेज
  स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत मराठी संगीत रंगभूमीवरील थोर कलाकार आणि खड्या आवाजाचे गायक श्रीयुत रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने वयाच्या नव्वदाव्या वर्षी नुकतेच निधन झाले. ही मनाला अतिशय चटका लावणारी घटना आहे. अत्यंत कष्टाळू , रंगभूमीविषयीची पराकोटीची निष्ठा , वागण्यातील प्रामाणिकपणा आणि निगर्वी प्रेमळ स्वभाव अशी गुणवैशिष्ट्ये असलेले आणि देवाघरचे ज्ञात कुणाला , गुंतता हृदय हे ,साद देती हिमशिखरे अशी एकाहून एक उत्तम नाट्यगीते, मयुरा रे फुलवित येरे पिसारा सारखी भावगीते , पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव , हे आदिमा हे अंतिमा अशी प्रार्थना गीते- भक्तीगीते आणि आणि प्रथम तुझं पाहता 'मुंबईचा जावई' हे अजरामर चित्रपट गीत गाऊन रामदास कामत यांनी मराठी रसिक मनावर अधिराज्य केले. सत्तरच्या दशकात मी शाळेत असताना पुणे आकाशवाणी केंद्रावरून सकाळी साडेआठच्या मराठी बातम्या झाल्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम लागत असे त्यामध्ये रामदास कामत यांची गाणी ऐकताना खूप आनंद मिळत असे.त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच या सर्वाचा आठव झाला आणि प्रकर्षाने आठवण झाली ती दिवाळी...

द मा मिरासदार श्रद्धांजली

 * ज्येष्ठ विनोदी साहित्यिक आणि कथाकथनकार श्री द मा मिरासदार हे कालच देवाघरी गेले त्यांच्यावर श्रद्धांजली वर दोन शब्द  . *..दमा  विनोदाचा निखळ झरा*           दमा म्हणजे निखळ मिश्किल विनोदाचा अखंड झरा..ग्रामीण भाषेचा योग्य वापर . ते  मूळचे पंढरपूर आमच्या सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक. दमा, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या त्रिकूटानं मराठी कथाकथन विश्वात अजोड कामगिरी केली . सर्वसामान्य माणसाला  चार घटका खळाळून हसवून निर्भेळ करमणूक करुत नवसंजीवनी दिली. त्यांचे कथाकथन गणेशउत्सवात व इतरत्र अनेक वेळा ऐकायला  मिळाले हे भाग्यच म्हणावे लागेल.कथाकथन करताना द मा उभे राहले की श्रोते तल्लीन होऊन  सकस एकपात्री अभिनय सहजसुंदर देहबोली अनुभवत  असत. "धोक्याचं वळण" " ड्रॉइंग मास्तरांचा तास" "माझी पहिली चोरी " ही कथा कथनं दमा उच्चारताच लगेचच ओठी येतात. मे  महिन्यातच"ऐसी कळवळ्याची जाती "हे श्रीयुत मिलिंद जोशी यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक मी वाचले होते . त्यात एक साहित्यिक कथाकथनकार आणि प्रेमळ हृदयाचा माणूस असे दमा यांचे व्यक्ती...

पु ल- एक जिवंत अनुभव

इमेज
  आज पु लंची जयंती ,विनम्र अभिवादन. पु ल- एक जिवंत अनुभव पु ल नेहमी सांगत असत सर्व प्राण्यांमध्ये माणसाला तेवढा हसता येतं आणि म्हणून प्रत्येक माणूस , त्याचा स्वभाव त्याच्या लकबी व लोकजीवन याविषयी त्यांना विलक्षण उत्सुकता असे. साहित्यातली अन संगीतातली 'अपूर्वाई 'काय असते हे त्यांनी मराठी माणसाला अतिशय सहजपणे सांगितलं. पु ल गेल्यानंतर त्यावेळी श्रद्धांजलीपर एक छोटसं काव्य सुचलं होतं ते आता जरा मुलामा देऊन (पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर थोडा नट्टापट्टा करून किंवा दिवाळी सीझन सुरू असल्याने फडताळातल्या मोठ्या पितळी भांड्यांना कलहई करून ) सादर करीत आहे. पु. ल गेले...... सारा आसमंत सुनासुना झाला अवघ मराठी मन हळहळलं... हृदयी पीळ पडला ... एक बहुरुपी गेला पुलंनी आम्हाला काय नाही दिलं.. श्वास मोकळा केला हसू फुटले , घाम टिपला जीव गहिवरला अश्रू तरळले आजार पळाला नैराश्य संपलं आशा पालवली माणसामाणसातील अंतर कमी केलं दातृत्वाला दिशा दिली...

झरोका....

इमेज
परवा मला एक मित्र म्हणाला कशी असते प्रेम कविता मी त्याला म्हटलं कवितेनं माझ्यावर प्रेम केलं , फिदा आहे ती माझ्यावर माझा दिवस जातो आनंदात तरीपण तू म्हणतोच आहेस तर ऐकवतो थोडंस. शाळेत असती ती कैरीच्या फोडी सारखी , लाल हिरवी बोरांसारखी सारखी आंबट-गोड, राय आवळ्यासारखी तुरट, लाल लाल बदाम गोड झाडा वर दगड मारून पाडणारी, दप्तर पाठीवर अडकून गळ्यात गळ्यात घालून चालणारी एकमेकाची खोडी काढणारी , म्हातारीच्या झाड्वरील कणसं काढून पिसं हवेत उडवणारी, रावळगाव चॉकलेट , चिंगम चघळणारी अगदी निरागस तर दहावी अकरावीत तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यातून नजरानजर आणि जिन्यावरून जाता-येता , ट्युशनला जाताना सहवास वाढवायचा प्रयत्न करणारी थोडी भाबडीच , कॉलेजमध्ये मात्र जरा समजून उमजून वही पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी, वाढदिवस निमित काढून भेट वस्तू देत घेत, कॅन्टीन मध्ये भेटणारी ट्रीपच्या आठवणीत रमणारी.. क्याडबरी सारखी.. तर पुढे पदवीनंतर ही स्टोरी फारच क्वचित पूढे सरकते... नवीन वाटा फुटतात उच्च शिक्षण घेत असताना,सुरवातीचं अर्थार्जन करताना नदीकिनारी पाण्यात पाय टाकून बसणारं समंजस अशीही वाहत...

फिरत्या चाकावरती...

इमेज
श्री शारदा माता प्रसन्न फिरत्या चाकावरती... शिवरात्र झाली थंडी संपत जाते आणि मार्च महिना उन्हाळा ऋतु बदल जाणवू लागतो . आपले पाणी पिण्याचे प्रमाण वाढू लागते. जरी फ्रिज असला तरी माठातील/ डेऱ्यातील गार पाणी पिण्याचे समाधान काही औरच. घरी नवीन माठ आणायला हवा असा सूर निघू लागला आणि संध्याकाळी मी व आमचे शेजारी बापूकाका माठ आणण्यास चालतच बाहेर पडलो. चालता चालता डेरा महात्म्य वर्णन सुरू झाले. सोलापूरकडे माठाला डेरा म्हणतात. या मातीच्या घड्याचे अनेक प्रकार आहेत-अगदी संक्रांतीची सुगडी, बोळकी ,दह्यासाठी वापरली जाणारी गाडगी, लाल अथवा काळ्या मातीचे माठ ,रांजण, कुंभ वगैरे .यात आणखीन एक प्रकार म्हणजे महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून येणारे विविध घाटाचे माठ तोटीचे चे अगर बिनतोटीचे इत्यादी. ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे तिथे माठातील पाणी हे पुरवणीस येणारे व समान गार पडत असलेने आरोग्यदृष्ट्याही हितकारक असल्याने त्याचा वापर हा होतोच. शेतावर तसेच वाड्यावस्त्यावर, गावाकडील बस थांबे रेल्वेस्टेशन्स इत्यादी ठिकाणी माठ/ लाल कापड लावलेले रांजण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची तहान भागवतात आणि अशी पाणीपुरवठा से...