पोस्ट्स

बन्सीधर

इमेज
किती मोहक लडिवाळ रूप कान्हा निळा सावळा  किती लाविसी रे लळा..... खेळ तव संचिताचा  परि आगळा कंसमामा झाला वैरी   सिद्ध तुला मारण्या  यमुना आला पूर.. तुला तारण्या  जन्म होता आरंभिल्या लिला  नवजात बाळ ते वासुदेव शिरी  पद लागता यमुना दुभंगली  म्हणून नीर ते अती पावन  भाविक ते करती प्राशन  वासुदेव देवकीस दिलेस वैराग्य  यशोदेस लाभले मातृसौभाग्य  दाविले विश्वरूप यशोदेस्  मिरवला होऊन नंदकिशोर  नवनीत चाटण्या तव ओठी  सारं गोकुळ धावे तुझ्यापाठी  सुखावती गाठी -भेटी  नवनित असे ते लौकिकी  परि होते ते अमृत अलौकिकी  सदा तव ओठी बासुरी,  म्हणूनी तू बन्सीधर   ऐकून मंजुळ ध्वनी  हर्षती धेनु डोलवती मान  गोड घंटानादानी करती नमन पुष्ट होती स्तन  मग होई क्षीर स्निग्ध मधुर  किमया तुझी अपरंपार म्हणून तू मनमोहन होता निसर्ग कोप  करांगुली वरी तोलीसी गोवर्धन   क्षणार्धी अवघे गोकुळ झालं  पुन्हा सघन सधन हरण केले महाभयंकर कालियाचे  स्वार झाला तया शिरावर केलं नर्तन श...

तुझ्या नामात रे गोडवा ......

इमेज
  सुमनताई  गळ्यात, नामात अन् रूपात रे किती गोडवा... किती गाऊ तव महिमा  भाव दाटले  साऱ्यां मराठी मनी  अश्रू अनावर नयनी  जरी असली बहुत  परि  उल्लेखितो मोजकी गाणी जागे केलेस आम्हा गाऊन जाग रे यादवा, सावळ्या विठ्ठला  केशवा माधवा  तुझ्या नामात रे गोडवा,  उठा उठा चिऊताई  गाऊन जागे केलेस चिमण्या बाळा     रिझवलेस  सान बालका अन् आईस  जोजवित अंगाई निंबोणीच्या झाडामागे बिंबविलीस माता महती गाऊन  आईसारखे  दैवत साऱ्या या जगता नाही सांगितले संसार मर्म गृहिणी कष्ट  गाऊन बहिणाबाईचे  अरे संसार संसार तवा चुल्ह्यावर   रिझवलेस तू प्रेमिका  रे क्षणांच्या संगतीने,   झिमझिम झरती श्रावणधारा   धरतीच्या कलशात, जिथे सागरा धरणी मिळते , केतकीच्या बनात नाचला ग मोर  एकदाच यावे सखया    कशी करू स्वागता म्हणूनी.... आणि  अंतर्मुख केलेस आम्हा सर्वां .....  उच्चारून समाधी घेऊन जाई ज्ञानदेव  अवीट गाणी अन् मधूर शब्द  अधिक अर्थवाही केलेस तयांना जशी माय वाढवी ...

शाश्वत

इमेज
श्रीमत्  दासबोध, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने , आदरणीय फडके शास्त्रीकृत सद्गुरु लीलामृत उपासना ग्रंथ यांची शिकवण अन् आदरणीय दादा (श्री पद्माकर बोंडाळे ) यांचे सतत मार्गदर्शन, प्रबोध यातून अवतरले हे काव्य सांगण्या....   या जगी  काय शाश्वत अश्वाशत  काय असे शिष्य सदगुरू लक्षण कसा होई जीवन मार्ग उन्नत सुलभ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध होय जाण  करुनी आदर भावे सर्वां सदा प्रणिपात श्रीराम चरणी अर्पण  न्यून ते करून घ्यावे पूर्ण  🙏🙏    विश्व व्यापारा नाही गणती  सहज सुंदर प्रेमभाव नसे मिती. तोल मोल असे सर्वांसी  मुके जीव आपणा सांगती,  पुढें करावा हात, मिळतील मग बहु सांगाती असे होत होत मिळते सद्गती आणि नरदेह मिळती   उन्नत करण्या हा नरदेह साधनात साधन  ते उत्तम नामस्मरण  वासना बीज भाजे जाळे  देव कोण मी कोण कळे अन् आकळे  भ्रांती सर्वथा पळे ,   परीस स्पर्श होता  लोह होई सुवर्ण   परि इथे शिष्य गुरू न भेदाभेद सद्गुरु करती आपणासारखे तत्काळ,   जरी आपण असे अनन्य ...

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

इमेज
कवितेच्या अंगणात ,गीतांच्या चांदण्यात पुष्प पहिले कवी मन हे नेहमीच जागरूक असत. सभोवताल, निसर्गातील विविध आविष्कार, ऋतुबदल ,आसपासचे सुखदुःखाचे विविध प्रसंग , हे टिपकागदाप्रमाणे त्याच्या अंतर्मनात साठत असतात हीच काव्यबीज असतात. स्वानुभव आणि परकायाप्रवेश यातून काव्य जन्म घेत. "फिरे रात्रंदिनी अवनी सुख दुःख भिडे कवी हृदयी उसंत मिळता उमटे कागदावंरी " या प्रक्रियेतून कवी व्यक्त होत राहतो. एखादी कविता किंवा गीत मला खूप आवडतं आणि ते आपल्याला का आवडते असं जर विचारलं तर त्यावेळी या कवितेमधील शब्दरचना, या कवितेमधील उपमा ,शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी, नादमयता मांडलेला विचार असा पण काहीतरी सांगतो परंतु या सर्वांचा आपण एकत्रित विचार केला तर ते झालं कवितेच रसग्रहण . कमी शब्दात जास्त आशय आणि एकाच कवितेतून एकापेक्षा जास्त अर्थ यक्त होण ही कविता या वांग्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच कवीस अभिप्रेत अर्थ आणि आपणास भावलेला अर्थ हाही वेगळा असू शकतो. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लागेल लावील वेड जीवा हे आशाताईंचं सुमधुर गीत ऐकलं ( कवी म पां भावे ) आणि अपूर...

बिंब प्रतिबिंब.....

इमेज
 बिंब प्रतिबिंब दृश्य बहु मनोहर.....  हे खरं की ते खरं...   भास आभास  सारा मायेचा खेळ,  जड ,चंचल, आणि निश्चळ  संत दाविती भेदाभेद  साधती योग्य मेळ * काव्य उमले फुले हेचि समर्थ वांग्मय अभ्यासाचे फळ अर्पण करतो सदगुरू चरणी होण्या सुफळ. * या ओळीचा गर्भितार्थ मानत मानत शिकवावे , संत सज्जन यांचा जन्म हा मानवांचा उद्धार करण्यासाठी झालेला असतो. आपण  ज्ञानी मोठे असलो तरीही ते स्वतःला सर्वसामान्य असे दाखवतात कारण त्यांना लौकिकातच राहून कार्य करावयाचे असते.  मानत मानत शिकवावे  बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध  उद्धरीत जावे सकळजना  असे त्यांचे कार्य असते.  संत नि:स्पृह असतात त्यांची  लक्षणे दासबोध यांत सांगितली आहेत  (  दशक १४ समास १ अखंड ध्यान नि:स्पृह लक्ष्मण नाम). Photo courtesy-   सारे फोटो हे चंबळ नदी परिसर , अभयारण्य  डॉक्टर घनश्याम बोरकर. डॉक्टर, निसर्गप्रेमी, संत साहित्य गाढे अभ्यासक प्रतिभावंत कवी, साहित्यिक, उद्योजक असे बहुआयामी मनस्वी व्यक्तिमत्व आहे.  त्यांची ओळख माझा सोलापूर येथील दयानंद कॉलेज...

रघुपती राघव गजरी गजरी रसग्रहण

इमेज
                       श्री सरस्वती प्रसन्न रेडिओवरील पहाटेचे भक्ती संगीत याने अंतर्मनावर केलेले संस्कार हे अमिट आहेत.त्यातीलच हे अतिशय मधुर गीत.... गीतकार पी सावळाराम, अष्टपैलू गायिका आशा भोसले आणि संगीतकार वसंत प्रभू  जणू त्रिवेणी संगमच. गळ्याची सहज फिरत घेत घेतलेला आदरणीय आशाताई यांचा पहिला आलाप श्रोत्यांचे कान टवकारतो ...रघुपती राघव ....गजरी गजरी.... हा उच्चार दीर्घ करून हे राम आगमन होत असल्यानं सारी वृक्षवल्ली हर्षाने नाचू बोलू डोलू लागली आहे, पक्षांचे गोड कूजन सुरू आहे हे भाव प्रदर्शित होतात. प्रतिभावंत कवी गीतकार पी सावळाराम यांचे शब्द शबरी आणि रामाचे , भक्त आणि देव याचे आगळं नाते स्वतःच्या स्वरातून पुढे त्या रसिकांच्या गळी उतरवतात. जशी आई खूप दिवसांनी, वर्षाने आपला बाळ भेटीस येत आहे त्यावेळी ती आनंदात त्याला आवडत असलेले सारे काही गोड धोड पदार्थ तयार ठेवते....आणि त्याच्या भेटीची आस तिला लागलेली असते तीच आस शबरीची आहे. रामनाम जपे वदे वाचे ती शबरी करी मानसपूजा ती भक्तीचे फळ चाखत होती,तर बोरे गोड आहेत ना याची चाचणी करू...

दवबिंदू......

  दवबिंदू निसर्ग अविष्कार सौंदर्य  व्हिडिओत लोभस टिपलं आहे .. ज्येष्ठ बंधू श्रीकांत यानं (now on USA tour) मी मोहून गेलो.... काव्य सुचेल असे वाटू लागले  मग पहाटे ते अवतरले ते काव्य     दवबिंदू...  सोनेरी पिवळे, तांबूस तुरे तोलून धरती दवबिंदूस दवबिंदू म्हणती तुऱ्यास  अणकुचीदार तरी सहन करता भार  तुरे म्हणती कसला भार  आम्ही नार... तू सरदार! खुलवीसी सौंदर्य अमुचे  म्हणूनी  वाट पहातो  तुला झेलण्या तासन् तास.. असे मैत्र फुले डोले  दिलखुलास..   तोशीस घेऊन स्नेह जपणे  शिकवी निसर्ग आम्हांस असे संवाद पडण्या कानी   जावे नित्य पहाटे फिरण्यास  डोळ्यांचे कान करून करावे थोडं बोलके मौनास...               करावे थोडं बोलके मौनास......

अक्षर प्रवास..हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️

इमेज
  अक्षर प्रवास.... हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️ जन्मल्यावरी उमटतो प्रथम हुंकार ,  हुंकार नव्हे तो आदिबीज ओंकार बाळ बोले डोळ्यातूनी सुरू होई मातृ नवजात तान्हा संवाद  बोबडे बोबडे ते कान्हा बोल   कळे आकळे मातृहृदयास  मग काऊ चिऊ वनराजी ओळख  अशी ही  नवबोली  आई दावी क्रमाक्रमाने  अक्षर खोली......   श्री  लिहून दावी आई    हातात पाटी पेन्सिल देई        गिरवाया अक्षर आरंभ    मग उमटते गमभन  गणेश शारदा ज्ञान शक्ती रूपे  देती नकळत आत्मभान  होतो यशस्वी शिक्षणक्रम पूर्ण करू मातृ पितृ शिक्षका वंदन ऋण  त्यांचे महान असे असावे हस्ताक्षर की  ठरावी ती आपली  अक्षर ओळख  लिहावे नित्य संत साहित्य  रामनाम अन् सुविचार  चिरंतन असे काही जे आहे  नित्यसत्य  अनुसरून ते राही विवेक जागृत लिहिता मिळतो मानसी आराम,आत्मिक समाधान  हात लिहिता ठेवता,  होते मनाची मशागत  मोहक हस्ताक्षर पाहता वाटे ही जणू मोत्यांची माळ  आनंद देई आपणांस  आणि पाहून वाचून द...

आठवणीतले आपटे काका

इमेज
  आठवणीतले आपटे काका सूर आणि शब्द संगीत आणि साहित्य याचा सुयोग्य मेळ साधणारे ,भूगोलाचे प्राध्यापक असलेले ,योग अभ्यासी आणि साऱ्या मधुकोशी मंडळींना त्यांच्या कलाकृती लेखन नाट्य अभिनय कलाविष्कार विविध माध्यमातून सादरीकरण यांना दिलखुलास दाद देणारे सदा प्रफुल्लित ,उत्साहीत असणारे आणि ठेवणारे काका देवाघरी गेली ही बातमी कानावर पडताच  चर्र झाले. काका हे अष्टावधानी होते.काका अधून मधून त्यांच्या गॅलरीतून चंद्र आणि सूर्य उदय अस्त, पावसाळ्यातील निसर्ग विभ्रम टिपत असत. पाठीमागच्या देशमुख यांच्या शेतातील चाललेल्या हालचाली ही ते टिपत असत. असे अतिशय प्रसन्न मनाचे आणि जीवन रसरसून जगणारे आपले आपटे काका आता हयात नाहीत.  गेले दीड दोन महिने मधुरंजन या व्हाट्सअप कट्ट्यावर तसेच इतरत्रही काका दिसले नाहीत. काकांची तब्येत बरी नव्हती परंतु त्यांना भेटता येणे खूप अवघड होते. त्यामुळे मधुरंजन किंबहुना मधुकोष हा सुना झाला होता.  जे जात्याच मोठे असतात त्यांना सामान्यजन्य अधिक मोठे करतात कारण त्यांचे कर्तृत्व आणि दातृत्व हे तितकंच मोठं असतं. आपटे काका असेच होते. चार-पाच महिन्यापूर्वीच त्यांनी अभिवाच...

खमंग चुरमुरे चिवडा

इमेज
अन्नपूर्णा वारसा... खमंग चुरमुरे चिवडा. कृती- पावकिलो चुरमुरे, (चाळून स्वच्छ करून घेणे), तेल 3 मोठे चमचे(पाव आमटी वाटी एवढे), वाळलेली ब्याडगी  मिरच्या तीन ते चार, मोहरी, जिरे, शेंगदाणे, डाळं कढीपत्ता, मेतकूट चवीसाठी अगदी थोडी पिठी साखर . चुरमुरे खारे असतात त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही ज्यांना लागत असेल त्यांनी अगदी कमी प्रमाणात सर्वात शेवटी वापरावे.  पाटी गरम करून त्यात तेल टाकून  शेंगदाणे पाववाटी तळून घ्या,आणि बाहेर काढून ठेवा,ताजा कढीपत्ता थोडा तळून घ्यावा, बाजूस ठेवावा नंतर चवीनुसार १ ते दीड( टेबल) 🥄 पोहे खातो तो चमचा मोहरी, जिरे, आणि  अर्धा चमचा हिंग,घालून फोडणी तडतडली की गॅस बंद करून त्यामध्ये मिरच्या टाकाव्यात. मिरच्या गॅस बंद करून ठेवून फोडणीत घाला (गॅस सुरु असता  आच जास्त झाल्याने काळया होतात म्हणून )नंतर डाळं टाकावे आणि मग सर्व चुरमुरे पाटीमध्ये ओतावेत.नंतर झाऱ्याने हलवावे. चुरुमरे गरम करण्याची गरज नाही (चुरमुरे भट्टी वाल्याकडून अगर भेळ वाल्याकडून घेणे ते कुरकुरीत असतात). नंतर त्यात शेंगदाणे ,चवीनुसार मेतकूट, अगदी थोडी चवीनुसार पिठीसाखर घालून ह...

कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू ....रसग्रहण

इमेज
१९ एप्रिल १९३० श्रेष्ठ गायिका मालती पांडे यांची जयंती. मालतीताईंनी खेड्यामधले घर कौलारू, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, लपविलास तू हिरवा चाफा, त्या तिथे पलीकडे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत . कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू हे एक मातेची ममता महती सांगणार गीत आहे. घरात तान्हं बाळ झोपलेलं असलं की की आपण पाय नका वाजवू असे म्हणतो परंतु या गीतामध्ये निसर्गातील इतर घटकांनाही असे आवाहन केले आहे. गीताचे शब्द मातेच्या हृदयागत कोमल हळुवार आहेत. मालतीताईंनी ते अतिशय लडिवाळपणे गायलं आहे. अंदाजे चार एक वर्षांपूर्वी मालती पांडे यांच्या स्मृतिदिनी पुणे आकाशवाणीवर "आमच्या संग्रहातून "या सदरात त्यांची मुलाखत ऐकली आणि या गाण्याने माझ्या मनात घर केलं.आज मालती ताईंच्या जयंतीच्या निमित्ताने ते रेडिओवर पुन्हा ऐकायला मिळाले.खूप दिवसापासून या गाण्याचे रसग्रहण करण्याचे योजले होते ते आज फलद्रूप होत आहे. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू नकोस चंद्रा येऊ पुढती थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू पुष्करिणीतून गडे हळुहळु जललहरी तू नको झ...