पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें -रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें  तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे     अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां  होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां     कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे  दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे   गीतरचना- विश्वनाथ जोगळेकर संगीत- अनिल मोहिले गायक - शरद जांभेकर भक्ती संगीत यातून परमेश्वराला एक प्रकारची आळवणी असते; परमेश्वराचे गुणगान असते. आपण करतो ती श्रवण भक्ती असते. गाण्याचे अथवा कवितेचे रचनाकार कवी गीतकार आणि संगीतकार यांची ती किर्तन भक्ती असते. पहाटेच्या वेळेला सारे वातावरण शांत असतं. माणसाला झोप झाल्याने तनमनात उत्साह असतो.मन प्रसन्न असतं; अशा वेळेला भक्ती संगीत आपल्याला ईश्वर शक्तीशी जोडलं जाण्याची संधी देत असते. महाराष्ट्राला संतांची तसेच थोर कवी आणि गीतकार यांची परंपरा आहे. 'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।' हा भागवतातील श्लोक उद्‌धृत करून, समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचे...

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली फुलारली झाडे -वेली जाग वारियासी आली वेळ शीतळ साजिरी पक्षी गाती नाना परी गेला दिस नाही येत काही करावे संचित साधा आपुलाले हित नाम वाचे उच्चारित नाम घेता घरी दारी उभा विठ्ठल कैवारी सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश मुखे करा नामघोष जाती जळूनिया दोष तुका म्हणे जन्मा वरी ठेवा तुळस- मंजिरी गीत- ग दि माडगूळकर संगीत आणि स्वर- स्नेहल भाटकर चित्रपट तुका झालासे कळस राग भूप आणि नट महाराष्ट्रामध्ये उज्वल आणि महान संत परंपरा आहे - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ समर्थ रामदास संत नामदेव बहिणाबाई आदि अनेक संत होऊन गेले. या संतांनी नरदेह दुर्मिळ असून या जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर ऐहिकात जगताना पारलौकिक कल्याण साधणे ही महत्त्वाचे आहे असे अभंग ओवी वांग्मय यातून नाना प्रकारे सांगितले आहे. प्रपंच जगत असतानाच परमार्थ करावयाचा आहे. कलियुगात संत सज्जन संगती, आणि नामस्मरण याचे अनन्य महत्व त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोणतेही उपास तपास, कठीण योगसाधना यापेक्षाही कोणतेह...