श्री सरस्वती देवी प्रसन्न पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली फुलारली झाडे -वेली जाग वारियासी आली वेळ शीतळ साजिरी पक्षी गाती नाना परी गेला दिस नाही येत काही करावे संचित साधा आपुलाले हित नाम वाचे उच्चारित नाम घेता घरी दारी उभा विठ्ठल कैवारी सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश मुखे करा नामघोष जाती जळूनिया दोष तुका म्हणे जन्मा वरी ठेवा तुळस- मंजिरी गीत- ग दि माडगूळकर संगीत आणि स्वर- स्नेहल भाटकर चित्रपट तुका झालासे कळस राग भूप आणि नट महाराष्ट्रामध्ये उज्वल आणि महान संत परंपरा आहे - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ समर्थ रामदास संत नामदेव बहिणाबाई आदि अनेक संत होऊन गेले. या संतांनी नरदेह दुर्मिळ असून या जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर ऐहिकात जगताना पारलौकिक कल्याण साधणे ही महत्त्वाचे आहे असे अभंग ओवी वांग्मय यातून नाना प्रकारे सांगितले आहे. प्रपंच जगत असतानाच परमार्थ करावयाचा आहे. कलियुगात संत सज्जन संगती, आणि नामस्मरण याचे अनन्य महत्व त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोणतेही उपास तपास, कठीण योगसाधना यापेक्षाही कोणतेह...
टिप्पण्या